समाजात आजही स्त्री जन्मावर असंख्य अडथळे आणि पूर्वग्रह आहेत. प्रत्येक कुटुंबाला मुलगा पाहिजे असतो, हे विचार समाजाच्या पिढ्यान्पिढ्या मानसिकतेत रुजलेले आहे. परंतु, जर एखाद्या गर्भवती महिलेला मुलगी झाली तर तिला सहन करावी लागणारी मानसिक आणि शारीरिक यातना, टोमणे, किंवा छळ हे अत्यंत निंदनीय आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितले तर, मुलगी जन्माला येणे हे स्त्रीची जबाबदारी नसून, पुरुषाच्या क्रोमोसोम्समुळेच ठरते की मुलगा होणार की मुलगी. तरीदेखील महिलेला यासाठी दोष देणे हा समाजाचा मोठा अपराध आहे.
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आज गर्भलिंग निदान सहज शक्य आहे आणि जर कुटुंबांना कळले की गर्भात मुलगी आहे, तर बर्याच वेळा गर्भपात करण्याचा निर्णय घेतला जातो. हे खूप दुर्दैवी आहे की अशा स्थितीत, मुलीच्या जन्माचे समर्थन करणाऱ्या महिलाच कधी-कधी दबावाखाली येऊन किंवा स्व:इच्छेने गर्भपाताची सहमती देतात. या प्रकारात एक महिला दुसर्या महिलेसाठी विरोधक ठरते, हे अत्यंत दुखःदायक आहे.
खरंतर स्त्रिया जन्माला येण्यापूर्वीच असुरक्षित आहेत. स्त्रियांचे रक्षण करण्यासाठी आणि मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी समाजाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी काय करता येईल:
1. कायदेशीर कडक कारवाई: मुलगी जन्माच्या आधी गर्भलिंग निदानावर कडक बंदी आणि अशा प्रकारांवर कठोर कायदेशीर शिक्षा असावी.
2. शिक्षण व जनजागृती: मुलगी आणि मुलगा दोघेही समान आहेत, यासाठी शाळा, कॉलेज, समाजात विविध कार्यक्रम, जनजागृती मोहीमा राबवायला हव्यात.
3. समानतेची जाणीव: घरातूनच मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव न करता समानतेचे शिक्षण दिले पाहिजे. मुलींना सर्व संधी दिल्या पाहिजेत.
4. महिलांची आर्थिक सक्षमता: महिलांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन आर्थिक सक्षमता निर्माण करणे हे त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी महत्वाचे आहे.
5. मनाचे परिवर्तन: मुलगी जन्माला आली तर ती घरातील लक्ष्मी आहे, या विचाराला समाजात रुजवणे महत्वाचे आहे. प्रत्येक स्त्री ही सन्माननीय आहे, याची जाणीव समाजात वाढली पाहिजे.
महिलांच्या सुरक्षेसाठी समाजात सकारात्मक बदल घडवणे:
समाजाच्या मानसिकतेत बदल घडवणे हे अत्यावश्यक आहे. स्त्री जन्माला येण्याचे स्वागत करणे आणि तिला तिचे स्वातंत्र्य, सन्मान आणि सुरक्षा प्रदान करणे हे आपले कर्तव्य आहे. मुलींच्या सुरक्षिततेसाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत.
कुटुंबातील प्रत्येक सदस्याने एकमेकांना पाठिंबा द्यावा, मुलींना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक करावे, आणि त्यांना शिक्षण, आरोग्य, आणि स्वातंत्र्याच्या दृष्टीने सक्षम करावे. समाजात असलेली ही "मुलगा-मुलगी" भेदभावाची भावना संपवणे हे आपले ध्येय असायला हवे.
No comments:
Post a Comment